रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पनवेल प्रतिनिधी : देशाच्या विकासाला नवी दिशा देत सर्वसमावेशक प्रगती, आत्मनिर्भर भारत, पायाभूत सुविधांचा विकास, डिजिटल क्रांती, सामाजिक कल्याण आणि जागतिक स्तरावर भारताची वाढती प्रतिष्ठा या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीची माहिती देण्यासाठी पनवेल येथे एका महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री व भाजपचे रायगड जिल्हा संपर्क मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृहात ही परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत बोलताना ऍड. आशिष शेलार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत देशात झालेल्या ऐतिहासिक विकासकामांचा आणि विविध जनकल्याणकारी योजनांचा सविस्तर आढावा उपस्थित पत्रकार व मान्यवरांसमोर अत्यंत प्रभावीपणे मांडला.
या प्रसंगी आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, सभापती वैकुंठ पाटील, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, अनुसूचित जाती मोर्च्याचे जिल्हा अध्यक्ष अमित जाधव, पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर, उपसभापती भूपेंद्र पाटील, पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महिला व बालकल्याण सभापती ममता म्हात्रे, उरण नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष रवी भोईर, खोपोली नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, राजेश भगत, महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा प्रिया मुकादम, माथेरान नगरपरिषदेचे संतोष शेलार, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गेल्या दशकभरात देशाने मारलेली गरुडझेप आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलेल्या शासकीय योजनांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यात आला. दरम्यान या पत्रकार परिषदेच्या तत्पूर्वी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या आवारात मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची गेल्या 12 वर्षांची कारकीर्द ही केवळ योजनांची किंवा आकडेवारीची गोष्ट नसून विकसित, आत्मनिर्भर, सुरक्षित आणि समृद्ध भारत घडविण्याचा एक ऐतिहासिक प्रवास आहे. गरीब, शेतकरी, महिला, युवक आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या सक्षमीकरणाद्वारे “विकसित भारत 2047″ चे स्वप्न साकार करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून आगामी काळातही विकासाचा हा प्रवास अधिक वेगाने सुरू राहील, असा विश्वास आज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे मंत्री व भाजपचे रायगड जिल्हा संपर्क मंत्री ऍड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने यशस्वीपणे पूर्ण केलेल्या 12 वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत विकास, सुशासन, जनकल्याण, राष्ट्रीय सुरक्षा, पायाभूत सुविधा, सांस्कृतिक पुनर्जागरण आणि जागतिक स्तरावरील भारताच्या वाढत्या प्रभावाची सविस्तर माहिती देण्यात आली. 2014 मध्ये देशाने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला, 2019 मध्ये अधिक मोठ्या बहुमताने पाठिंबा दिला आणि 2024 मध्ये सलग तिसऱ्यांदा सत्तेची संधी देत जनतेने विकासाच्या राजकारणावर शिक्कामोर्तब केले. आज राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) देशातील 22 राज्यांमध्ये जनसेवा करत असून, जनतेचा विश्वास हीच मोदी सरकारच्या यशाची सर्वात मोठी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले. सलग तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पंतप्रधानांनी सर्वप्रथम प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या फाईलवर स्वाक्षरी केली. यावरून गरीब, शेतकरी, महिला आणि युवक हे सरकारच्या धोरणांच्या केंद्रस्थानी असल्याचे स्पष्ट होते.सार्वजनिक विश्वास आणि सुशासनाचा नवा अध्याय”सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास” या मंत्राला मोदी सरकारने केवळ घोषणेत न ठेवता जनआंदोलनाचे स्वरूप दिले. प्रत्येक योजनेचा लाभ समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यावर सरकारने भर दिला. तंत्रज्ञानाधारित प्रशासन, थेट लाभ हस्तांतरण (DBT) आणि पारदर्शक यंत्रणांमुळे लाखो बनावट लाभार्थी हटवण्यात आले आणि सरकारी निधीची मोठ्या प्रमाणावर बचत करण्यात यश आले.देशाच्या सीमा आणि अंतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक आणि दहशतवादाविरोधातील कठोर कारवायांमुळे भारताने जगासमोर आपली ठाम भूमिका स्पष्ट केली. नक्षलवादाविरोधातील प्रभावी मोहिमेमुळे अनेक भागांमध्ये शांतता आणि विकासाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.गरीब कल्याणासाठी अभूतपूर्व उपक्रमसलग तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पंतप्रधानांनी सर्वप्रथम प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या फाईलवर स्वाक्षरी केली. यावरून गरीब, शेतकरी, महिला आणि युवक हे सरकारच्या धोरणांच्या केंद्रस्थानी असल्याचे स्पष्ट होते. मोदी सरकारच्या काळात प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत 58 कोटींहून अधिक बँक खाती उघडण्यात आली असून त्यापैकी 32 कोटींहून अधिक खाती महिलांच्या नावावर आहेत. कोविड-19 महामारीच्या काळापासून 81 कोटींहून अधिक नागरिकांना मोफत धान्य पुरविण्यात आले. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 60 कोटींहून अधिक आरोग्य कार्ड वितरित करून गरीब कुटुंबांना मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे 58 कोटींहून अधिक नागरिकांना विमा संरक्षण मिळाले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 4 कोटींहून अधिक कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उज्ज्वला योजनेद्वारे 11 कोटी महिलांना मोफत गॅस जोडणी देऊन धुरापासून मुक्त जीवन देण्यात आले. जल जीवन मिशनअंतर्गत 16 कोटींहून अधिक ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळाले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत 12 कोटींहून अधिक शौचालयांची उभारणी करून देशात स्वच्छतेची क्रांती घडवून आणण्यात आली.लघु उद्योजक, कारागीर आणि रोजगार निर्मितीला चालनापीएम स्वनिधी योजनेअंतर्गत 74 लाखांहून अधिक पथविक्रेत्यांना सुलभ कर्ज उपलब्ध झाले आहे. मुद्रा योजनेद्वारे 57 कोटींहून अधिक तारणमुक्त कर्जांचे वितरण करण्यात आले आहे.प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमुळे 30 लाखांहून अधिक पारंपरिक कारागीर आणि हस्तकला व्यवसायिकांना थेट लाभ मिळाला आहे.आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी 15 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानासाठी 79 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.शेतकरी सन्मान आणि ग्रामीण विकासप्रधानमंत्री किसान सन्मान निधीअंतर्गत 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 4.3 लाख कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत 7 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना सुमारे 10 लाख कोटी रुपयांची कर्ज सुविधा उपलब्ध झाली आहे. शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन कर्ज मर्यादा 3 लाखांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या “थेंब थेंबाने अधिक पीक” या अभियानामुळे 109 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले आहे. यामुळे पाण्याची बचत, उत्पादनवाढ आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे सांगण्यात आले.महिला सक्षमीकरणाला नवी दिशालखपती दीदी योजनेअंतर्गत 3 कोटींहून अधिक महिलांना आर्थिक सक्षमीकरणाचा लाभ झाला आहे.सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत 4.5 कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत. सुरक्षा दलांमध्ये महिला अधिकाऱ्यांची संख्या 3 हजारांवरून 11 हजारांपर्यंत वाढल्याने राष्ट्रीय सुरक्षेत महिलांचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढला आहे.पायाभूत सुविधांमध्ये विक्रमी गुंतवणूक2014 मध्ये देशात 91,287 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग होते. आज हे जाळे 1.46 लाख किलोमीटरपेक्षा अधिक झाले आहे. महामार्ग बांधणीचा वेग 11.6 किलोमीटर प्रतिदिनवरून 34 किलोमीटर प्रतिदिनपेक्षा अधिक झाला आहे.प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत देशातील गावांमध्ये जवळपास 8 लाख किलोमीटर पक्क्या रस्त्यांचे जाळे निर्माण झाले असून त्यापैकी जवळपास 4 लाख किलोमीटर रस्ते गेल्या 12 वर्षांत बांधण्यात आले आहेत.चिनाब रेल्वे पूल, नवीन पंबन पूल, अटल टनेल यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांनी देशाच्या प्रगतीला नवी गती दिली आहे.रेल्वेच्या ब्रॉडगेज विद्युतीकरणाचे 99.6 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 1,337 पेक्षा अधिक रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण सुरू आहे.आज देशात 164 हून अधिक वंदे भारत एक्सप्रेस गाड्या कार्यरत असून आधुनिक रेल्वे सेवांचे प्रतीक बनल्या आहेत.2014 मध्ये केवळ 5 शहरांमध्ये असलेले 248 किलोमीटर मेट्रो नेटवर्क आज 26 पेक्षा अधिक शहरांमध्ये 1,095 किलोमीटरपेक्षा जास्त विस्तारले आहे.गेल्या 12 वर्षांत 90 हून अधिक नवीन विमानतळ उभारण्यात आले असून देशातील एकूण विमानतळांची संख्या 164 पेक्षा जास्त झाली आहे. उडान योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांनाही हवाई प्रवासाची संधी उपलब्ध झाली आहे.डिजिटल इंडिया आणि ऊर्जा क्षेत्रातील क्रांतीसौभाग्य योजनेअंतर्गत प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचविण्यात आली आहे. भारतनेट प्रकल्पाद्वारे 2.14 लाख ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड इंटरनेटशी जोडण्यात आले आहे.डिजिटल व्यवहार, ऑनलाइन सेवा आणि पारदर्शक प्रशासनामुळे भारत डिजिटल परिवर्तनाचा जागतिक आदर्श ठरला आहे.आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील प्रगतीगेल्या 12 वर्षांत 23 नवीन एम्स आणि वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली आहे. ईशान्य भारतातील जनतेची दीर्घकालीन मागणी पूर्ण करत आसाममध्ये पहिले एम्स सुरू करण्यात आले आहे.मिशन इंद्रधनुषअंतर्गत 54 कोटींहून अधिक मुलांना मोफत लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.विकासासोबत वारशाचे संवर्धनगुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होण्यासाठी राजपथचे नामकरण कर्तव्य पथ असे करण्यात आले. इंडिया गेट परिसरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित पंचतीर्थ विकसित करण्यात आले. भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी गौरव दिन म्हणून साजरी केली जात आहे.स्टॅच्यू ऑफ युनिटी, नवीन संसद भवन, राष्ट्रीय युद्ध स्मारक, अमृत उद्यान आणि पवित्र सेंगोल यांसारख्या उपक्रमांनी राष्ट्राभिमान अधिक बळकट केला आहे.जगात भारताची वाढती प्रतिष्ठा”वसुधैव कुटुंबकम” या भारतीय तत्त्वज्ञानाला मूर्त रूप देत भारताने जागतिक स्तरावर एक जबाबदार आणि विश्वासार्ह राष्ट्र म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.कोविड काळात “लस मैत्री” उपक्रमाद्वारे अनेक देशांना औषधे आणि लसींची मदत पुरविण्यात आली. जी-20 अध्यक्षपदाचे यशस्वी नेतृत्व, 39 नवीन दूतावास, वाढती परकीय गुंतवणूक आणि विविध मुक्त व्यापार करार हे भारतावरील जागतिक विश्वासाचे प्रतीक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. आज 177 देश आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत असून भारतीय संस्कृतीचा जागतिक प्रभाव सातत्याने वाढत आहे, असेही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले.
