रायगड लोकधारा वृत्तसेवा :
अविनाश जाधव वार्ताहर
कळंबोली पनवेल प्रतिनिधी : सिडको ने चालू केलेली नवी मुंबई मेट्रो ची पहिली लाईन बेलापूर ते तळोजा 2011 ला चालू झालेली 2023 मध्ये लोकार्पण केली तेव्हापासूनची दुसरी मार्गे का शी मंजुरीच्या प्रस्तावासाठी सरकार कडे पडून होती. अनेक वर्षांच्या विलंबानंतर अखेर राज्य सरकारने नवी मुंबईमधील दुसऱ्या मेट्रोला मंजूरी दिली आहे. सिडकोने 15 वर्षांपूर्वी या प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य सरकराजवळ मांडला होता. यंदाच्या अर्थसंकल्पात यासाठी तब्बल 5,575 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे नवी मुंबईतील अनेक ठिकाणांना जोडणी मिळणार असून पुढे नवी मुंबई विमानतळाशीही जोडण्याची योजना आहे.
कशी असेल मार्गिका ?
ही 8.15 किमी लांब मार्गिका तळोजा आणि खांदेश्वरदरम्यान उभारण्यात येणार आहे. या मार्गिकेमुळे कामोठे, कळंबोली आणि तळोजासारख्या शहरांना जोडणी मिळणार आहे. यामुळे पनवेल परिसरातील विकासालाही चालना मिळणार आहे. ही मेट्रो तयार झाल्यानंतर नवी मुंबई शहरात रेल्वे, मेट्रो आणि विमानतळ अशा प्रमुख पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. या मेट्रोचा प्रस्ताव पहिल्यांदा 2011मध्ये सिडकोने मांडला होता. त्यावेळी या मार्गाचा अंदाजित खर्च हा 1,605 कोटी रुपये इतका अपेक्षित होता. आता 2026मध्ये मंजुरी नंतर 15 वर्षात हा खर्च 5 हजार 575 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. हा खर्च मार्गे का बांधकामासाठी लागणारा आहे यामध्ये येणाऱ्या विविध अंतर्गत अंतर्वाहिन्यांचा सोडून आहे.
कुठे असतील स्थानकं ?
तळोजा-खांदेश्वर मेट्रो मार्गिकेवर एकूण 8 स्थानकं प्रस्तावित आहेत. ही मार्गिका कामोठे, कळंबोली, तळोजा एमआयडीसी आणि खांदेश्वर या भागांमधून जाणार आहे. या मार्गावर खांदेश्वर, कामोठे सेक्टर 10, कळंबोली सेक्टर 2E, कळंबोली सेक्टर 7E, कळंबोली सेक्टर 13, कडाडी, एमआयडीसी स्थानक 1, एमआयडीसी स्थानक 2 अशी आठ स्थानके प्रस्तावित आहेत. सध्या नवी मुंबईमध्ये बेलापूर ते पेंढार मेट्रो मार्गिका आहे. या मार्गिकेशी नवी मुंबई मेट्रो 2 ला थेट जोडण्याचा देखील प्रस्ताव आहे.
मेट्रो 1 आणि मेट्रो 2 च्या जोडणीसाठी 2.2 किमी विस्ताराची गरज असणार आहे ज्याला अद्याप मंजुरी मिळाली नाही आहे. दरम्यान, 2 किमी स्पर मार्गिकेने नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत पण थेट जोडणीचा प्रस्ताव आहे.
तळोजा एमआयडीसी परिसरात दररोज हजारो कर्मचारी प्रवास करतात. या औद्योगिक केंद्रामध्ये प्रवास करण्यासाठी नागरिकांना बस किंवा लोकलने प्रवास करावा लागतो. रोजची लोकलची गर्दी आणि वाहतूककोंडीतून यामुळे नागरिकांची सुटका होणार आहे. मेट्रो मार्गिका सुरू झाल्यावर या परिसरातील उद्योगांना चालना मिळणार आहे. त्याशिवाय नवी मुंबईतील प्रवासही सोपा होणार आहे.
