रायगड लोकधारा वृत्त :
छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
एका ३६ वर्षीय महिलेने शारीरसुखाची मागणीला नकार दिल्यामुळे १९ वर्षीय तरुणीने तिच् अंगावरती कटरने वार केले. त्यामुळे तिला तब्बल २८० टाके घालावे लागले. सव्वादोन फुटांचा एक वार तर मानेपासून मांडीच्या खालपर्यंत आहे. ही पीडिता मृत्यूपेक्षाही भयानक वेदना सहन करत आहे. या महिलेवर एक खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. अभिषेक तात्याराव नवपुते असे या आरोपीचे नाव आहे.या घटनेनंतर संपूर्ण गावात काही घडलेच नाही अशा आविर्भावात नराधम आरोपी फिरत होता. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
या घटनेनंतर छत्रपती शिवाजीनगरने संताप व्यक्त केला जात आहे. बलात्काराच्या प्रयत्नानंतर 36 वर्षीय विवाहितेने आरडाओरडा सुरू केल्याने आरोपीने तिच्यावर क्रूरपणे अनेक वार केले. तिचा चेहराही विद्रूप करत तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली असून अभिषेक तात्याराव नवपुते (19, रा. घारदोन) असे विकृताचे नाव आहे, चिकलठाणा पोलिसांनी त्याला मंगळवारी अटक केली आहे.
पीडिताने घटनेची माहिती देताना सांगितले की,माझ्या अंगावर त्याने इतके वार केले की, डॉक्टरला गोधडीसारखे माझ्या शरीरावरील टाके शिवावे लागले. हे टाके शिवण्यासाठी 22 हजार रुपयांचा दोरा लागला आहे. एकही अवयव असा नाहीये की जिथे फाडलेलं नाही. या यातना सहन होत नाही, पण रडताही येत नाही. कारण, डोळ्यातून आलेलं पाणी टाके शिवलेल्या जखमेला लागलं तर आणखीच आग आग होते. आता मी करू तरी काय ? असं ती पिडित महिला म्हणते.
36 वर्षांच्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी 19 वर्षांच्या तरुणाने केली होती. यावेळी महिलेने नकार दिला म्हणून रागाच्या भरात नराधमाने तिच्या शरीरावर कटरने सपासप वार केले. त्यामुळे तिच्या अंगावर तब्बल 280 टाके घालावे लागलेत. पीडितेच्या मानेपासून ते कमरेपर्यंत सव्वादोन फुटांचा एक वार आहे ही महिला एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. घरातील परिस्थिती जेमतेम असून महिलेला 11 वर्षांची दोन मुलं आहेत. माहेर आणि सासरची परिस्थितीही हलाखीची आहे. पीडितेवर उपचार करण्यासाठी आता जो खर्च येईल त्यासाठी त्यांकडे पुरेसे पैसेही नाहीत. पिडीतेच्या अंगावर 280 टाके पडले आहेत, यासाठी लागणाऱ्या दोऱ्यांचा खर्चच 22 हजार इतका आला आहे.
महिला शेतात काम करत असताना अभिषेकचा तिला फोन येतो. त्यावेळी आरोपी फोनवर बोलतो की, एक तर तू माझ्याबरोबर झोप, नाही तर तुझ्या जावेशी माझे जुळवून दे. हे ऐकूनच महिला फोन कट करते. त्यानंतर संध्याकाळी महिला शेतातलं काम संपवून पांदीच्या रस्त्याने एकटीच जात असेत. त्यावेळी अचानक पाठीमागून येऊन आरोपीने वेणी खेचली आणि डोके दगडावर आपटलं. क्षणभर महिलेला काही समजलं नाही तेवढ्यातच त्यानं पहिल्यांदा कटरनं चेहऱ्यावर वार केला. महिला ओरडायचा प्रयत्न केला तर त्यानं गळ्यावरच वार केला आणि लगेच सपासप सगळीकडे वार सुरू केले. पाठीवरचा वार तर एवढा भयंकर होता की मानेपासून मांडीपर्यंत चिरून काढला, अशा विकृत मानसिकतेच्या नराधम आरोपीपासून महिलेने बचावाचा प्रयत्न केला, पण त्याने तिच्यावरती वार करत तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.
