रायगड लोकधारा वृत्त :
प्रतिनिधी: श्री.सतिश वि.पाटील : आज दिनांक : २९ मार्च २०२५ रोजी मुलुंड पोलिस ठाण्याच्या आवारात सकाळी ११ वाजता तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये पोलीस ठाण्यात दाखल व प्राप्त झालेल्या एफ.आय.आर ,एन.सी तसेच तक्रार अर्जातील एकूण ७० महीला /पुरूष तक्रारदार यांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते.त्यापैकी एकूण १८ महीला व १४ पुरूष असे एकूण ३२तक्रारदार मुलुंड पोलिस ठाणेस हजर होते .यात ११जेष्ठ नागरिक हजर होते.
सदर कार्यक्रमात पोलिस निरीक्षक मा.कोकाटे सर (जनसंपर्क),पोलिस निरीक्षक मा.चव्हाण सर( सायबर) व इतर पोलीस अधिकारी यांची उपस्थिती होती.उपस्थित तक्रारदार यांच्या समस्यांबाबत बाबत दोन्ही पक्षांना समोरासमोर बसवून चर्चासत्र घेऊन योग्य मार्गदर्शन करण्यात आले .यात घरगुती, व्यवसायिक, मालक – भाडेकरू यांचा समावेश होता.हरवलेल्या वस्तू मध्ये पाच मोबाईल तक्रारदारांना परत देण्यात आले.मुलुंड मधील नागरिकांचा देखील या जनता दरबाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे .पोलिस व जनता यातील दरी या कार्यक्रमातून दूर करण्याचे काम मुलुंड पोलिस ठाणे अनेक वर्ष अविरत करीत आहेत. मुलुंड पोलिस ठाणे वरिष्ठ यांच्या संकल्पनेतुन कार्यक्रम राबविण्यात येतो.



