रायगड लोकधारा वृत्तसेवा :
रायगड लोकधारा प्रतिनिधी / नाशिक : 2012 च्या बॅचच्या आयपीएस ऑफिसर तेजस्विनी सातपुते विद्यमान काळात अतिशय चर्चेला जात आहे. नाशिकच्या “महाराष्ट्र ॲप्सटिन फाईल” मध्ये अडकलेला भोंदु बाबा अशोक खरात उर्फ कॅप्टन बाबा याच्या मुसक्या आवळण्यात तेजस्विनी सातपुते यांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
इतिहास आणि मराठीचा अभ्यास करून तेजस्विनी सातपुते यांनी आयपीएस पदापर्यंत आपली मजल मारलेली आहे. विशेष म्हणजे इंग्रजी भाषेच्या संदर्भात त्यांना भीती असताना सुद्धा केवळ जिद्द चिकाटी व परिश्रमाच्या बळावर तेजस्विनी सातपुते यांनी आपली आगळी वगळी ओळख निर्माण करत स्वतःला या उच्च पदापर्यंत पोहोचवलेले आहे.
तेजस्विनी सातपुते यांची नाशिकच्या भोंदू बाबा प्रकरणात एसआयटी तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याच हिमतीच्या बळावर अशोक खरात सारख्या भोंदू बाबाला कारागृहात पाठवण्याचे धाडस करता आले आहे.
कॅप्टन अशोक खरात हा स्वतःला ज्योतिषाचार्य आणि अंक ज्योतिष तज्ञ म्हणवत असे. कॅप्टन ही पदवी पण त्याने स्वतःलाच बहाल केलेली होती. आणि हा सेलिब्रिटी ज्योतिषाचार्य होता.
एका 35 वर्षीय महिलेने याच्या विरोधात बलात्काराच्या गुन्ह्याची तक्रार दिली म्हणून याला अटक केली परंतु अटक केल्यानंतर याच्या मोबाईल मध्ये जवळपास 57 58 आक्षेपार्ह अ,श्लील व्हिडिओ सापडले आहेत.
पण हा सेलिब्रेटी ज्योतिषाचार्य होता कारण याच्या मंदिराला स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भेट दिली होती. राधाकृष्ण विखे पाटील, एकनाथ शिंदे रूपाली चाकणकर यांच्याबरोबरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेतच परंतु सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे स्वतः रूपाली चाकणकर या अशोक खरातची पाद्यपूजा करताना चा फोटो व्हायरल होत आहे. गोष्ट इथेच संपत नाही. या अशोक खरात च्या ट्रस्टवर सुद्धा रूपाली चाकणकर या सदस्य आहेत.
हे असे लोक राजकारण्यांच्या नावाचा आश्रय घेऊन गरीब लोकांवर अ,त्या,चार करतात आणि त्यांना राजकारण्यांच्या नावाची धमकी देतात. स्वतः महिला आयोगाच्या अध्यक्ष असल्या व्यक्तीच्या डोक्यावर छत्री धरत आहेत किंवा पाद्य पूजा करत आहेत जो स्वतः से-क्स रॅकेट चालवत असल्याचा संशय आहे आणि ब,ला-त्का-रासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये अटक आहे.
मला चाकणकरांना विचारायचं आहे तुम्ही स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस सुनेत्रा अजित पवार गट या पुरोगामी पक्षाच्या सदस्य आहात. तुमचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार कुठल्याही ज्योतिषावर, अंकशास्त्रज्ञावर किंवा महाराजांवर विश्वास ठेवत नव्हते. त्यांच्या हातात घड्याळात शिवाय कुठल्याही ग्रहाची अंगठी कधी दिसली नाही.
ज्या महायुतीच्या सरकारमध्ये तुम्ही आहात त्या महायुतीचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांनी सुद्धा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे असे अभिमानाने काढलेले उद्गार तुम्ही ऐकले असतील. तेंव्हा तुमच्यासारख्या इतक्या जबाबदारीच्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तींनी असल्या भोंदूगिरीला बळ द्यावे ही शरमेची बाब तुम्हाला वाटत नाही का…?
काल रात्री उशिरा रूपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला ही बाब वेगळी यामागे अशोक खरात प्रकरण नक्कीच आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत राजकारण सुद्धा तेवढेच जबाबदार आहे रूपाली चाकणकर यांची महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून असलेली भूमिका ही निरंतर वादग्रस्तच राहिलेली आहे त्याचा हा परिपाक नक्कीच आहे दादा गेल्यानंतर रूपालीताईंचा बळी जाणार हे निर्विवाद सत्य आहे व ते सिद्ध झाले…
व या सर्व प्रकरणाला खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप देण्यात तेजस्विनी सातपुते आयपीएस यांची भूमिका ही हिमतीची जिगरीची व तेवढीच जिकरीची सुद्धा होती हे कोणीही नाकारु शकत नाही.
