रायगड लोकधारा वृत्त :
ऐ जाते हुए लम्हों जरा ठहरो, जरा ठहरोsss नवी नवरी सोल्जर पतीला बॉर्डरवर पाठवताना झाली भावूक…
जळगाव प्रतिनिधी : ना अंगावरची हळद उतरली होती, ना हातावरच्या मेंदीचा रंग फिका झाला होता. नव्या नवरीच्या डोळ्यांतून आसवं थांबत नव्हती, कारण तिचा सोल्जर पती देशाच्या रक्षणासाठी बॉर्डरकडे निघाला होता. हा प्रसंग बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा चित्रपट ‘बॉर्डर’मधला नाही तर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील आहे.
काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिलला पाकिस्तानी दहशतवादी काही पर्यटकांना टार्गेट केलं होतं. या हल्ल्यात 28 पर्यटकांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार मारलं होतं. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यानं 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं. या मोहिमेमुळे भारत-पाकिस्तानच्या सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील जवानांच्या सु्ट्ट्या रद्द करून त्यांना तातडीनं सीमारेषेवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचा येथील जवान मनोज ज्ञानेश्वर पाटील याला देखील सीमेवर तातडीने पोहोचण्याचा आदेश मिळाला. मनोज पाटील याचा विवाह 5 मे रोजी पार पडला होता. मनोज आणि यामिनीने अग्नीला साक्ष माणून सातफेरे घेतले. पण, कुटूंबापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ समजून मनोज देशाच्या रक्षणासाठी बॉर्डरकडे रवाना झाला. मनोजच्या अंगावरची हळद उतरली नव्हती. त्याच्या हातावरच्या मेंदीचा देखील रंग फिका झालेला नसताना त्याला बॉर्डरकडे रवाना व्हावे लागले. मनोजला निरोप देण्यासाठी त्याची नवी नवरी यामिनी देखील रेल्वे स्टेशनवर आली होती. तिच्या डोळ्यांतील आसवं थांबत नव्हती. बॉर्डर चित्रपटातील सुपरहीट गीत ‘ऐ जाते हुए लम्हों जरा ठहरो, जरा ठहरोsss’असाच काहीसा अनुभव यामिनीला आला असावा.
बँडबाजापासून थेट बॉर्डरपर्यंत…
पाचोरा शहरात राजीव गांधी कॉलनीत राहणारे मनोज पाटील यांचा विवाह 5 मे रोजी पार पडला. मात्र, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत-पाकिस्तानच्या सीमेवर तणाव वाढला आहे. मनोज पाटील यांची सुट्टी रद्द होऊन त्यांना तातडीने सीमेवर हजर राहाण्याचा आदेश मिळाला. ते लग्नाच्या तिसऱ्या दिवशीचे म्हणजे 8 मे रोजी कर्तव्यभूमीकडे रवाना झाले.
पाचोरा रेल्वे स्टेशनवर अलोट गर्दी..
सोल्जर मनोज पाटील यांना सीमेवर पाठवताना पाचोरा रेल्वे स्टेशनवर अलोट गर्दी झाली होती. यावेळी मनोज पाटील यांची आई-वडील आणि पत्नी यामिनी हिच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नव्हते. नातेवाईक आणि गावकरी देखील भावूक झाले होते.
पत्नीला दिलं वचन…
सोल्जर मनोज पाटील यांनी त्यांच्या नवविवाहित पत्नीला वचन दिलं की ते विजयश्री घेऊनच परततील. अंगावरची हळद उतरली नसतानाही मनोज पाटील यांनी देशसेवेसाठी तत्परता दाखवली. मनोज पाटील यांच्या शौर्यपूर्ण निर्णयाचं गावातच नाही तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात कौतुक होत आहे.
ऐ जाते हुए लम्हों जरा ठहरो, जरा ठहरोsss नवी नवरी सोल्जर पतीला बॉर्डरवर पाठवताना झाली भावूक…
author-479260408
Authored by: Sandip Parolekar
Updated May 8, 2025, 20:56 IST
Jalgaon News: ना अंगावरची हळद उतरली होती, ना हातावरच्या मेंदीचा रंग फिका झाला होता. नव्या नवरीच्या डोळ्यांतून आसवं थांबत नव्हती, कारण तिचा सोल्जर पती देशाच्या रक्षणासाठी बॉर्डरकडे निघाला होता. ही घटना आहे जळगाव जिल्ह्यातली…पुढे वाचा
Aajche Rashi Bhavish…
Follow Us
Manoj Patil Soldier Jalgaon News
ऐ जाते हुए लम्हों जरा ठहरो, जरा ठहरोsss नवी नवरी सोल्जर पतीला बॉर्डरवर पाठवताना झाली भावूक…
Jalgaon News: ना अंगावरची हळद उतरली होती, ना हातावरच्या मेंदीचा रंग फिका झाला होता. नव्या नवरीच्या डोळ्यांतून आसवं थांबत नव्हती, कारण तिचा सोल्जर पती देशाच्या रक्षणासाठी बॉर्डरकडे निघाला होता. हा प्रसंग बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा चित्रपट ‘बॉर्डर’मधला नाही तर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील आहे…
काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिलला पाकिस्तानी दहशतवादी काही पर्यटकांना टार्गेट केलं होतं. या हल्ल्यात 28 पर्यटकांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार मारलं होतं. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यानं 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं. या मोहिमेमुळे भारत-पाकिस्तानच्या सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील जवानांच्या सु्ट्ट्या रद्द करून त्यांना तातडीनं सीमारेषेवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचा येथील जवान मनोज ज्ञानेश्वर पाटील याला देखील सीमेवर तातडीने पोहोचण्याचा आदेश मिळाला. मनोज पाटील याचा विवाह 5 मे रोजी पार पडला होता.
मनोज आणि यामिनीने अग्नीला साक्ष माणून सातफेरे घेतले. पण, कुटूंबापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ समजून मनोज देशाच्या रक्षणासाठी बॉर्डरकडे रवाना झाला. मनोजच्या अंगावरची हळद उतरली नव्हती. त्याच्या हातावरच्या मेंदीचा देखील रंग फिका झालेला नसताना त्याला बॉर्डरकडे रवाना व्हावे लागले. मनोजला निरोप देण्यासाठी त्याची नवी नवरी यामिनी देखील रेल्वे स्टेशनवर आली होती. तिच्या डोळ्यांतील आसवं थांबत नव्हती. बॉर्डर चित्रपटातील सुपरहीट गीत ‘ऐ जाते हुए लम्हों जरा ठहरो, जरा ठहरोsss’असाच काहीसा अनुभव यामिनीला आला असावा.
हेही वाचा…
सामान्य नागरिकांना टार्गेट केल्यास जशास तसं उत्तर देणार, भारताचा पाकिस्तानला स्पष्ट इशारा
बँडबाजापासून थेट बॉर्डरपर्यंत…
पाचोरा शहरात राजीव गांधी कॉलनीत राहणारे मनोज पाटील यांचा विवाह 5 मे रोजी पार पडला. मात्र, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत-पाकिस्तानच्या सीमेवर तणाव वाढला आहे. मनोज पाटील यांची सुट्टी रद्द होऊन त्यांना तातडीने सीमेवर हजर राहाण्याचा आदेश मिळाला. ते लग्नाच्या तिसऱ्या दिवशीचे म्हणजे 8 मे रोजी कर्तव्यभूमीकडे रवाना झाले.
पाचोरा रेल्वे स्टेशनवर अलोट गर्दी..
सोल्जर मनोज पाटील यांना सीमेवर पाठवताना पाचोरा रेल्वे स्टेशनवर अलोट गर्दी झाली होती. यावेळी मनोज पाटील यांची आई-वडील आणि पत्नी यामिनी हिच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नव्हते. नातेवाईक आणि गावकरी देखील भावूक झाले होते.
पत्नीला दिलं वचन…
सोल्जर मनोज पाटील यांनी त्यांच्या नवविवाहित पत्नीला वचन दिलं की ते विजयश्री घेऊनच परततील. अंगावरची हळद उतरली नसतानाही मनोज पाटील यांनी देशसेवेसाठी तत्परता दाखवली. मनोज पाटील यांच्या शौर्यपूर्ण निर्णयाचं गावातच नाही तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात कौतुक होत आहे.
आपला एकटा जवान 10 पाकड्यांना भारी!
मनोज पाटील यांचा देशअभिमान पाहून त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांचा सगळ्यांना अभिमान देखील वाटत आहे. ‘आपला एकटा जवान 10 पाकड्यांना भारी ठरेल आणि विजयश्री खेचून आणेल, असे गौरोद्गार उपस्थितांनी यावेळी काढले
युद्ध टळो आणि…
समाजसेवक सचिन सोमवंशी यांनी सोल्जर मनोज पाटील यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. शुभेच्छा दिल्या आणि देवाकडे प्रार्थना केली की, “युद्ध टळावं आणि आपले जवान सुखरूप परत यावेत.” संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे देखील सचिन सोमवंशी यांनी यावेळी सांगितलं.
