रायगड लोकधारा वृत्त :
कळंबोली प्रतिनिधी अविनाश जाधव : MMRDA Investment in Maharashtra: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) यांच्याकडून देशातील सर्वात मोठा अशा सामंजस्य करार करण्यात आला. एकाच वेळी 4 लाख 7 हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा MMRDA चे चेअरमन श्री.एकनाथ शिंदे यांनी सांगितले. बांद्रा कुर्ला संकुल येथील जियो वल्ड सेंटर येथे आयोजित केलेल्या इंडिया ग्लोबल फोरम 2025 च्या कार्यक्रमात विविध सामंजस्य करार करण्यात आले.
MMRDA ने विद्युत मंत्रालयाच्या महारत्न कंपनी REC लिमिटेड, पावर फाइनेंस कॉर्पोरेशन, हाऊसिंग एंड अर्बन डेवलपमेंट कॉर्पोरेशन (HUDCO), इंडियन रेलवे फाइनेंस कॉर्पोरेशन, नेशनल बॅंक फॉर फाइनेंसिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेवलपमेंट यांसारख्या कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले. हे सामंजस्य करार मिनीरत्न, महारत्न आणि नवरत्न कंपन्यांसोबत केल्याने अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. हे सामंजस्य करार केल्यामुळे MMR (मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण) मध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासाला गती मिळण्यासाठी केले. गेल्या तीन वर्षांत दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये 20 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत, जेआजपर्यंतच्या इतिहासातील MMRDA चा एक मोठे रेकॉर्ड आहे. यावर्षी MMRDA ने दावोसमध्ये साडे तीन लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार करून त्याचे पालनही केले आहे. हे सामंजस्य करार मुंबई, ठाणे आणि त्याच्या आसपासच्या परिसर क्षेत्रातील विकासाला चालना देईल असे मत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मांडले.
भारत आता ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (GCC) हब म्हणून उभा राहिला असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बेंगलोर, हैदराबाद, पुणे आणि गुड़गाँवमध्ये 1,500 पेक्षा जास्त ह्या GCC कार्यरत आहेत. जगभरातील प्रमुख कंपन्या ह्या जसे की गूगल, अॅमेझॉन, गोल्डमॅन सॅक्स आणि जेपी मॉर्गन या कंपन्यांचे GCC भारतात विविध ठिकाणी कार्यरत आहेत. पुणे येथे आज एक नवीन GCC सुरू करण्यात आले आहे, ज्यामुळे भारतातील तरुणांना जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांशी काम करण्याचे संधी मिळेल. GCC च्या माध्यमातून भारताची क्षमता जागतिक स्तरावर वाढली जाईल.
भारताच्या लाखो इंजिनीअर्स, IT तज्ञ आणि कौशल्यपूर्ण युवकांना GCCमध्ये संधी मिळत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), रोबोटिक्स आणि डेटा अॅनालिटिक्स सारख्या अत्याधुनिक क्षेत्रात भारताला जागतिक नेता बनवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. MMR च्या क्षेत्राला 2030 पर्यंत 300 बिलियन डॉलरच्या GDP पर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी 135 बिलियन डॉलरचा गुंतवणूक प्राप्त करणे आवश्यक आहे. यामुळे आणखी 28 ते 30 लाख लोकांना रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मागील तीन वर्षांमध्ये महाराष्ट्राने गुंतवणुकीसाठी अनुकूलअसे वातावरण तयार केले आहे. वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर, कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आणि मजबूत शासन यामुळे महाराष्ट्र हे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रिय तसेच स्थानिक व्यवसायांकरिता उद्योजक यांचे पसंतीचे ठिकाण बनले आहे. इलेक्ट्रिक मोबिलिटी, लॉजिस्टिक्स, सेमीकंडक्टर विनिर्माण आणि AI, हेल्थटेक, एडटेक अशा क्षेत्रात गुंतवणकीस प्रोत्साहन दिले जात आहे.
भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या 5 ट्रिलियन डॉलर लक्ष्याच्या दिशेने हे सर्व उपक्रम महत्त्वाचे आहेत. जीसीसी आणि इतर व्यवसायिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती भारताच्या अर्थव्यवस्थेला मजबुती देत आहे. आताच्या आणि भविष्यातील इन्व्हेस्टमेंटसाठी महाराष्ट्र एक खुला आणि आकर्षक प्रदेश आहे असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या पत्रकार समोर म्हणाले.
