रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पत्रकार कैलासराजे घरत खारपाडा, पेण : “नाटकाचे लेखक मा.श्री.विश्वास पाटील, आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष साहित्यरत्न मा.श्री.प्रा.एल.बी.पाटील यांची प्रमुख उपस्थिती”
“जय हनुमान नाट्य मंडळ” गोवठणे-उरण प्रस्तुत “रणांगण” या नाटकाचा प्रयोग या नाटकाचे लेखक मा. श्री. विश्वास पाटील, आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष-साहित्यरत्न मा.श्री.प्रा.एल बी पाटील सर आणि नाट्य रसिक मायभगिनी आणि बंधूंच्या उपस्थितीत शनिवार दि.२३ मे २०२६ रोजी रात्री १०.३० वा. ठिकाण-गोवठणे( उरण-रायगड) येथे सादर करण्यात आला. या नाटकाचे दिग्दर्शक पांडुरंग पाटील यांनी केले. निर्माता लक्ष्मीकांत म्हात्रे, सहदिग्दर्शन शैलेंद्र म्हात्रे. पार्श्वगायन जितेंद्र म्हात्रे, सुत्रधार आणि संगीत सुरेश म्हात्रे, रंगभूषा उदय तांगडी( ठाणे), वेशभूषा: श्री बापूजी देव फॅन्सी ड्रेस कोप्रोली, नेपथ्य: राजा जोशी दादर ध्वनीमुद्रण व्यवस्था मयूर साऊंड पनवेल, रंगमंच व्यवस्था: हर्षद म्हात्रे गोवठणे, हिंद भूमीच्या अस्मितेसाठी मराठ्यांनी न भूतो न भविष्य तो असा छेडलेला महासंग्राम “रणांगण” या ऐतिहासिक दोन अंकी नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. ३५ कलाकारांना सोबत घेऊन हा प्रयोग यशस्वी रित्या, रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस अगदी परिपूर्ण उतरला.
भूमिका साकारणारे ३५ कलाकार…अहमदशहा अब्दाली: निलेश म्हात्रे, नजीब खान:अशोक म्हात्रे, मल्हारराव होळकर: नरेंद्र वर्तक, नानासाहेब पेशवा: जगन वर्तक, सदाशिवराव भाऊ: कृष्णनाथ म्हात्रे, विश्वासराव: रोहन म्हात्रे, जनकोजी शिंदे: विवेक वर्तक, दत्ताजी शिंदे: अतीष वर्तक, इब्राहिमखान गारदी: प्रेम पाटील, रघुनाथराव: अक्षय पाटील, शहाबली: महेश पाटील, जहाँखान: चरण वर्तक, भागिरथी: सौ शीतल म्हात्रे, पार्वतीबाई: सौ.कांचन म्हात्रे, गोपिकाबाई: कु.सोनम म्हात्रे, बेगम रुखसार: कु.प्रियंका पाटील, गारदी १: आकाश पाटील, गारदी २: साई म्हात्रे, गारदी ३: वैभव पाटील, गारदी ४: चरण वर्तक, मराठा सरदार: नील पाटील, स्वराज पाटील, श्रेयस पाटील, जेरेशास्त्री: प्रेम पाटील, पुनालकर: वैभव म्हात्रे, अग्नीहोत्री: संदेश म्हात्रे, मराठा सैनिक: नील पाटील, वेदू पाटील, मुसलमान सैनिक: हर्ष पाटील, स्वराज पाटील, विंचूरकर: जगन वर्तक, गायकवाड:अतिश वर्तक, ब्राह्मण स्त्री:भार्वी पाटील, पूर्वी पाटील अशा एकूण ३५ कलाकारांनी यात सहभाग घेतला होता असं भव्यदिव्य नाटक आपल्या गोवठणे गावच्या रंगभूमीवर मोठ्या उत्साहात संपन्न झाले..गोवठणे गावाला नाटकाची मोठी परंपरा लाभली आली, नाट्य कलाकार मंडळी हा वारसा पुढील पिढीपर्यंत नेत आहेत त्याबद्दल विश्वास पाटील सरांनी नाट्य कलाकारांचे तोंडभरून कौतुक करून शुभेच्छा दिल्या. या ऐतिहासिक नाटकाला सर्व रसिक जनता साक्षीदार होती आणि खऱ्या अर्थाने या मराठी नाट्यभूमीच्या मराठी रंगमंचाला आणि आपल्या मातीतील भूमिपुत्र कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी “रणांगण” नाटक पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी पहायला मिळाली. अतिशय उत्फूर्त प्रतिसादात हा नाट्य प्रयोग संपन्न झाला. सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे घरत यांनी देखील सर्व नाट्य कलाकारांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

