Oplus_131072
रायगड लोकधारा वृत्तसेवा :
रायगड लोकधारा प्रतिनिधी / कोल्हापूर : डिजिटल युगात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. कमी वेळात जास्त पैसे कमावण्याच्या खोट्या आमिषाला बळी पडून कोल्हापूर जिल्ह्यातील एका होतकरू विद्यार्थिनीने आयुष्य संपवल्याची अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. 😔
📍 काय आहे संपूर्ण प्रकरण ?
राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील आकांक्षा अनिल जोशी ही १९ वर्षीय विद्यार्थिनी उच्च शिक्षणासाठी शहरातील महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होती. उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणारी आकांक्षा एका सायबर जाळ्यात अडकली.
सायबर भामट्यांनी तिला “२० हजार रुपये गुंतवा आणि काही वेळात ५० हजार रुपये मिळवा” असे आमिष दाखवले. झटपट पैसे मिळवण्याच्या नादात तिने पैसे गुंतवले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
📞 “बाबा पैसे पाठवा…”
यानंतर अधिक पैशांची मागणी होत असल्याने आकांक्षाने आपल्या वडिलांना फोन करून पैसे पाठवण्याची विनंती केली. “दुप्पट पैसे मिळतील” असे सांगत तिने वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र वडिलांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत तिला समजावले आणि पैसे पाठवण्यास नकार दिला.
💔 मानसिक तणावातून टोकाचे पाऊल…
पैसे बुडतील, आपली चूक घरच्यांना समजेल या भीतीने आकांक्षा मानसिक तणावात गेली. या नैराश्यातून तिने वसतिगृहातील खोलीत अत्यंत दुःखद पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.
कुटुंबीयांची मागणी…
आकांक्षाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सायबर गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
ही घटना प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठा इशारा आहे !
👉 ऑनलाईन “दुप्पट पैसे”, “जलद नफा”, “Instant Profit” अशा आमिषांना बळी पडू नका.
👉 कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी खात्री करा.
👉 मानसिक तणावात असाल तर कुटुंबीयांशी आणि मित्रांशी संवाद साधा…
एका क्षणाच्या चुकीने एका तरुण आयुष्याचा अंत झाला…
भावपूर्ण श्रद्धांजली…
